Video : संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली, म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला हा निर्णय...

Farmer destroy agriculture at yavatmal
Farmer destroy agriculture at yavatmal

दिग्रस (जि. यवतमाळ) : असे म्हणतात, "संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असतात.' कधी अस्मानी तर कधी सुलतानी... कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ... सावकार व बाजारात व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक वेगळीच... अशा कठीण परिस्थितीतही शेतकरी आपले काम करीत असतो. दिवस-रात्र, उन्हातान्हात शेतात राबत असतो. कोणत्याही कठीण परिस्थितीसमोर तो हार मानत नाही. मात्र, यंदा आलेल्या वेगळ्याच संकटाने शेतकरी पार हवालदिल झाला आहे. या संकटाचे नाव आहे कोरोना... 

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका... तालुक्‍यातील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी अरुण दुधे... त्यांची पेळू शिवारात पाच एकर शेती... अरुण दुधे हे दरवर्षी भाजीपाल्याचे पीकं घेतात. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलांचे शिक्षण करतात. टमाटे, पत्तागोबी, फुलगोबी, सांभार, पालक, मेथी, कांदा व वालाच्या शेंगा असे विविध पिके ते घेतात. यातून दरवर्षी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न त्यांना होत असे. 

मात्र, यावर्षी ऐन हंगाम व लग्नसराईच्या तोंडावर कोरोना विषाणूच्या संकटाने तोंड वर काढले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉऊकडाऊ घोषित करण्यात आले. यामुळे घरातून बाहेर निघणेही कठीण झाले. मात्र, जीवनावश्‍यक वस्तूंची देवाण-घेवाण सुरू राहील असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. यात भाजीपाल्याचा समावेश आहे. 

मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता भाजी बाजार बंद केल्याने भाज्यांचे भाव गडगडले आणि शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. लागवड व उत्पादन खर्च तर सोडाच भाजीपाला काढणाऱ्या शेतमजुरांची मजुरीसुद्धा निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटत सापडला आहे. यामुळे हताश झालेले दुधे यांनी टमाट्याच्या मळ्यात चक्‍क गुराढोरांना चरण्यासाठी मोकळे सोडले. तर पत्ता व फुलगोबीसह इतर पालेभाज्या उपटून फेकले. 

आता तुम्हीच सांगा कस जागयच

कोरोना विषाणूच्या संकटाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने मायबाप सरकार आता तुम्हीच सांगा आम्ही कस जगायच अशी आर्त हाक शेतकरी अरुण दुधे याने सरकारला घातली आहे. कोरोनामुळे लाखोंचा आर्थिक फटका बसलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सरकार मदतीचा हात देईल का? अशी आस शेतकऱ्यासह नागरिक लावून बसले आहे.

पीक गुरांच्या स्वाधीन

यंदा शेतकऱ्यांचे दार कोरोना नावाच्या विषाणूने वाचवले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक घोर संकटात सापडले आहेत. खरेदीदार नसल्याने भाजीपाला पाल्याच्या भावात विकावा लागत आहे. त्यामुळे उद्विग्न शेतकऱ्याने अखेर आपल्या पाच एकरांत गुरे सोडून टमाटे व फुलगोबीचे पीक गुरांच्या स्वाधीन केले. कोरोना, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्‍यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com