सततच्या पावसामुळे सोयाबीनला शेंगा फुटल्याच नाही, मग निराश शेतकऱ्याने पिकात फिरवला ट्रॅक्टर

मारेगाव : शेतातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरविताना शेतकरी.
मारेगाव : शेतातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरविताना शेतकरी.

मारेगाव (जि. यवतमाळ) : सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या पाचही एकरातील सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


त्यामुळे तालुक्‍यातील बोरी (गदाजी) येथील निराश झालेल्या संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याने पाच एकरातील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून घामाने पिकविलेल्या पिकाला उद्ध्वस्त केले.

पिकांचे प्रचंड नुकसान
 

यंदा मारेगाव तालुक्‍यात झालेल्या सततच्या पावसाने कापूस व सोयाबीन या सर्वाधिक लावगड क्षेत्र असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोरी (गदाजी) येथील संभाजी बेंडे यांच्या पाच एकरात सोयाबीन पीक होते.

सोयाबीनला फुटले कोंब

मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने तालुक्‍यात जोरदार व सातत्यपूर्ण हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराशा व संतापाच्या भरात या शेतकऱ्याने शेतात उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून ते नष्ट केले.

मनावर दगड ठेवला
पाच एकरात सोयाबीन पेरले होते. मात्र अति पावसामुळे शेंगा भरल्याच नव्हत्या. त्यामुळे मनावर दगड ठेवून पिकावर ट्रॅक्‍टर फिरविला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. आता रब्बी हंगामाची तयारी करतो आहे. बघतो यातून तरी काही फायदा होतो की नाही.
- संभाजी बेंडे, शेतकरी.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com