चिठ्ठी लिहून शेतकऱ्यांची आत्महत्या 

चिठ्ठी लिहून शेतकऱ्यांची आत्महत्या 

कळमेश्वर, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील धापेवाडा खुर्द येथे एका शेतकऱ्याने शेतकर्जापोटी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 14) सायंकाळी उघडकीस आली. महादेव रघुनाथ रानडे (वय 48, रा. धापेवाडा खुर्द) असे मृताचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार, मृत महादेव रानडे यांच्याकडे चार एकर शेती असून गेल्यावर्षी कापसावर आलेल्या बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले. कपाशी लागवडीसाठी मृतक महादेव यांनी लोकांकडून हातउसने पैसे घेतल्याचे माहिती असून याबाबत त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. महादेव यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार असून घटनेच्या वेळी पत्नी शेतामध्ये होती, तर मुलगा बाहेर होता. मुलीचे लग्न झाले असून महादेव हे घरातील प्रमुख कमावते व्यक्ती होते. महादेव यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याच्या घटनेने धापेवाडा आणि परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com