
कारंजा (जि. वर्धा) : अनेक जण प्रेमात पडतात कालांतराने त्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. मात्र असे नशीब प्रत्येकाचे असेलच असे नाही. कुटुंबाच्या विरोधामुळे कित्येक प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींना त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याच प्रेमामुळे एखाद्याला जीव गमवावा लागला तर? अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे.
येथे राहणाऱ्या अतुल दुधकवरे या तरुणाला शेजारी राहत असलेल्या शिवाजी पाटमासे यांच्या मुलीवर प्रेम जडले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ही बाब शिवाजी पटमासे यांना लक्षात आल्यावर त्यांना याला विरोध दर्शवला. त्यात अतुल आणि शिवाजी पाटमासे यांचा वादही झाला. पण त्यानंतर असे काही घडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
अतुल आणि शिवाजी पाटमासे हे एकाच परिसरात एकमेकांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. यातून अतुल आणि परिसरातील या तरुणीचे आपसात प्रेमसंबध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली. त्यांनी या मुलाचा शोध घेत आठ दिवसांपूर्वी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतरही मुलीच्या प्रेमसंबंधाचे भूत शिवाजीच्या डोक्यात कायम राहिले.
वादाचा राग त्याच्या डोक्यात असताना काल रात्री अचानक अतुल घरासमोर उभा असल्याचे दिसले. यामुळे संतापलेल्या शिवाजी पाटमासे याने धारदार शस्त्राने भोसकून अतुलचा खून केला. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडून पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.