उपअभियंत्यांच्या खुर्चीला घातला हार

file photo
file photo

यवतमाळ : पाणीटंचाईच्या काळातही तब्बल 25 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे भोसा येथील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयात गुरुवारी (ता.13) धडक दिली. महिलांची कैफियत ऐकण्यासाठी कार्यालयात कोणी अधिकारीच हजर नसल्याने संतप्त महिलांनी उपअभित्यांच्या खुर्चीलाच हार घातला.
पावसाळा सुरू झालेला आहे. असे असले तरीदेखील जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. यवतमाळ शहरात टंचाई नसली तरी नियोजनाअभावी अनेक भागांतील नागरिकांना पाणी मिळण्यात अनेक अडचणी जात आहेत. निळोणा व चापडोह या प्रकल्पांत जलसाठा असूनही नियोजन नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. भोसा परिसरातील  सोसायटीमध्ये गेल्या 25 दिवसांपासून पाणीपुरवठाच झालेला नाही. मागणी करूनदेखील कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील संतप्त महिलांनी  गुरुवारी (ता.13) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. तब्बल गेल्या 25 दिवसांपासून पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, त्यातच अधिकारी उपस्थित राहत नसल्याने महिलांनी उपअभियंता यांच्या खुर्चीलाच हार घालून जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कामकाजाचा तीव्र निषेध नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com