Amravati News : गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाला निम्माच लाभ

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सांत्वना निधी देण्यात येतो.
gopinath munde accident insurance
gopinath munde accident insurancesakal

अमरावती - शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शासनाकडून त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सांत्वना निधी देण्यात येतो. सरत्या वर्षात जिल्ह्यात ७४ शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेचा निम्मा लाभ देण्यात आला असून अपंगत्व आलेल्या दोन शेतकऱ्यांनाही लाभान्वित करण्यात आले आहे. अद्याप जिल्ह्यास ७९ लाख रुपये निधीची आवश्यकता असून तशी मागणी नोंदविण्यात आली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतात काम करताना शेतकऱ्यांचे अपघात होतात. प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो, तर काहींना कायमचे अपंगत्वही येते. अशावेळी घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटुंबावर होत असलेल्या आघातातून सावरण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये तर अपंगत्व येणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. या योजनेतील कठीण वाटणाऱ्या अटी काढण्यात आल्या असून त्या आता सुलभ करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरीय समितीलाच प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

१९ एप्रिलपासून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत प्राप्त झालेल्या ८३ प्रस्तावांपैकी शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे ७४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून दोन प्रस्ताव शेतकऱ्यांना कायम अपंगत्व आल्याची आहेत. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदानासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी कृषी विभागास ७१ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

हा निधी वितरित करण्यात आला असून ७९ लाख रुपयांच्या निधीची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती कृषि विभागाने दिली. तालुकास्तरीय समितीला प्राप्त झालेल्या ८३ प्रस्तावातील पाच प्रस्ताव कागदपत्रे अपूर्ण असल्याची आहेत, तर दोन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत.

तालुकानिहाय मंजूर प्रस्ताव -

अमरावती - २, भातकुली - ६, नांदगाव खंडेश्वर -७, चांदूररेल्वे - ५, धामणगावरेल्वे - ६, मोर्शी - ५ , वरुड - १०, चांदूरबाजार - २ , तिवसा - ८ ,अचलपूर - ८, दर्यापूर - ६, अंजनगावसुर्जी - ५, चिखलदरा - ६

अपंगत्व आलेले प्रस्ताव -

धामणगावरेल्वे - १, अचलपूर - १

नामंजूर प्रस्ताव -

वरुड - १, चांदूरबाजार - १

कागदपत्रांअभावी अपूर्ण प्रस्ताव -

चांदूररेल्वे - १, चांदूरबाजार - १, धारणी - ३

परिपूर्ण प्रस्ताव सादर करा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानूग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघाती मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे. योजनेतील जाचक वाटणाऱ्या अटी काढून टाकण्यात आल्या असून लाभ घेण्याकरिता शेतकरी कुटुंबांनी समोर यावे व प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com