जीएसटीचा भार शेतकऱ्यांवर

जीएसटीचा भार शेतकऱ्यांवर

अमरावती -  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्ये बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सोमवारनंतर (ता. आठ) संपास प्रारंभ होण्याची शक्‍यता असून तत्पूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चेनंतर संपाचा निर्णय होणार आहे. अडत्यांना पाच टक्के जीएसटी लागू करण्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्राने देशभरातील बाजार समित्यांमधील अडत्यांना जीएसटीच्या कक्षेत आणले आहे. ४ सप्टेंबरला राज्याने त्यासंदर्भातील अधीसूचना जारी केली असून अडत्यांना पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. अडत्यांना त्यामुळे जीएसटीची नोंदणी करणे व कर भरणे अनिवार्य आहे.

अडत्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांना १ रुपया ७५ पैसे प्रतिशेकडा दलाली मिळते. त्यातूनच दुकानांच्या भाड्यासह विद्युत देयके, नोकरांचा पगार, शेतकऱ्यांचा नास्ता-चहापाण्याचा खर्च करावा लागतो. सर्व प्रकारचा खर्च वजा केल्यास अडत्यांना मोजके पैसे उरतात, असा अडते संघटनेचा युक्‍तिवाद आहे. 

राज्यभरातील बाजार समित्यांमधील अडते संघटना सरकारच्या निर्णयामुळे संतप्त झाल्या आहेत. त्यांनी या निर्णयास सामूहिक विरोध करण्याचे ठरविले असून सोमवारनंतर बेमुदत बंद पुकारण्यावर विचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com