पिकांवरील फवारणी मजुरांसाठी घातक

File photo
File photo

यवतमाळ : कीडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीचा जोर जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत चार शेतमजुरांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पिकांवरील फवारणी यंदाही शेतमजुरांसाठी घातकच ठरत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांची वाढ झालेली आहे. आता कीडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षाकीट उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येत असला तरी शेतमजूर किटचा वापर करताना दिसत नाहीत. गेल्या मंगळवारी (ता.13) सचिन विठ्ठल राठोड (वय 35, रा. खापरी, जि. वाशीम), गजानन कवडू कासार (वय 40, रा. येरद), बुधवारी (ता.14) गणेश नामदेव धुरत (वय 40, रा. जामडुना, जि. वाशीम), मारोती प्रकाश जाधव (वय 30, रा. शारी, ता. आर्णी), अशी विषबाधितांची नावे आहेत. आठवड्याभरापूर्वीच नेर तालुक्‍यातील शेतकऱ्याचा फवारणीने मृत्यू झाला होता. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी कीटकनाशकांच्या फवारणीने तब्बल 22 शेतकरी व शेतमजुरांचा बळी घेतला. हजारो बाधित झालेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नाही. मात्र, 150 जणांना बाधा झालेली होती. ऑगस्ट महिन्यात फवारणीच्या कामाला वेग येताच रुग्ण उपचारासाठी दाखल होऊ लागले आहे. प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास धोका अधिकच वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com