शेतकऱ्यांना दिलासा : चणाखरेदीच्या उद्दिष्टात हजारो मेट्रिक टनने वाढ

८७ हजार २४५ मेट्रिक टनने अधिकची वाढ करण्यात आली आहे
gram purchaseIncreased
gram purchaseIncreasedsakal

वर्धा - शासनाच्या चणाखरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने राज्यात खरेदीला ब्रेक बसला. यामुळे नियमानुसार नोंदणी करणारे अनेक शेतकरी खरेदीच्या रांगेतच राहिले. त्यांना दिलासा मिळावा याकरिता शासनाने आता चणाखरेदीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्दिष्टात ८७ हजार २४५ मेट्रिक टनने अधिकची वाढ करण्यात आली आहे.

राज्यात हमीभावाने चणाखरेदीसाठी केंद्र शासनाने यापूर्वी सहा लाख ८९ हजार २१५ मेट्रिक टन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुषंगाने १ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली. त्यात एकूण एक लाख ६९ हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ६७ लाख १३ हजार ५३५ क्विंटल चणाखरेदी करण्यात आली.

राज्याच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजाच्या ३३ लाख ४३ लाख मेट्रिक टन अपेक्षित उत्पादनाच्या आधारे केंद्र शासनाने सात लाख ७६ हजार ४६० मेट्रिक टन सुधारित उद्दिष्ट निश्चित केले आहे. शासनाची खरेदी बंद होताच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेला चणा खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. खरेदी बंद झाल्याची माहिती व्यापाऱ्यांना असल्याने पडक्या दरात चणाखरेदीचे धोरण अवलंबिले. यात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. आता उद्दिष्ट वाढविल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यात प्रयत्न असला, तरी अनेकांकडे चणा नसल्याने त्याचा लाभ साठेबाजांनाच होणार असल्याची चर्चा आहे.

पावसाचे संकेत, हंगाम तोंडावर

शासनाने चणाखरेदीला मुदतवाढ देण्याचे संकेत दिले आहे. अशात काही शेतकऱ्यांनी घरात चणा साठवून ठेवला आहे. आता ही खरेदी सुरू झाल्यास तिथे चणा न्यावा की शेतीच्या कामांना प्राधान्य द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com