Vidhan Sabha 2019 : टपाल मतपत्रिकेसाठी आज शेवटचा दिवस 

file photo
file photo

नागपूर : निवडणुकीच्या प्रक्रियेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्‍यक टपाल मतपत्रिका घेण्यासाठी सोमवार (ता. 14) शेवटचा दिवस आहे, अशी माहिती जिल्हानिवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 
निवडणुकीच्या कामात जवळपास 19 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपत्रिका आवश्‍यक आहे. ही मतपत्रिका त्यांना नियुक्ती असलेल्या मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मिळणार आहे. यासाठी त्यांना निवडणूक नियुक्तीच्या आदेशासह ओळखपत्र आवश्‍यक असणार आहे. सोमवारी तीन वाजेपर्यंत टपाल मतपत्रिकेसाठी अर्ज करायचा असून, 23 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येईल. यासाठी आवश्‍यक गॅजेटेट अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 हजार 512 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com