अखेर त्या महिलेचा मृत्यू 

file photo
file photo

अमरावती : घराची भिंत बांधकामावरून शेजाऱ्यांसोबत सुरू असलेला वाद पेटला. त्यामुळे पेट्रोल ओतून महिलेने जाळून घेतले. त्या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 17) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
राजकन्या दादाराव वानखडे (वय 40, रा. पेठपुरा, अंजनगावसुर्जी), असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (ता. 16) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून भिंतीचा वाद सुरू आहे. त्यातून शेजारी राहणाऱ्यांसोबत राजकन्या यांचा वाद सुरू होता. घटनेच्या काही वेळेपूर्वी पुन्हा वाद झाला. त्यानंतर पेट्रोलपंपावर जाऊन पेट्रोल आणल्यावर ते राजकन्या यांनी स्वत:च्या अंगावर ओतून घरासमोरच जाळून घेतले. 85 टक्के जळालेल्या राजकन्या यांना बुधवारीच उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोन महिला आणि दोन पुरुष अशा चौघांनी वाद घातल्याचे इर्विनमध्ये दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात सदर महिलेने सांगितले. त्याआधारे गुरुवारी (ता.17) नात्यातील दोन महिला व दोघे पुरुष अशा चौघांविरुद्ध अंजनगावसुर्जी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पेट्रोलपंप संचालकाची चौकशी 
दुचाकी किंवा चारचाकी वाहनामध्येच पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल भरता येते. बॉटल किंवा कॅनमध्ये पेट्रोल विकण्यास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे या घटनेत महिलेस अंजनगावसुर्जीच्या पेट्रोलपंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल कसे दिले. हाच प्रश्‍न घटनेमुळे उद्भवला. त्यामुळे पेट्रोलपंप संचालकांची याप्रकरणात चौकशी केल्या जाईल, असे अंजनगावसुर्जी पोलिसांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com