राम मंदिरासाठी कायदा हवा - मोहन भागवत

रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत.
रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत.

नागपूर - लोक म्हणतात, तुमचेच सरकार आहे तर मंदिर का बनत नाही, पण सरकार बदलल्याने मागण्या पूर्ण होतात, हा भ्रम आहे आणि तो आजही कायम आहे. राजकारण आडवे आले नसते तर राम मंदिर कधीच झाले असते. आता सरकारने लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा. या संदर्भात देशात संत-महात्मा जे पाऊल उचलतील, त्यास आमचा पाठिंबा असेल, असा इशारा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दिला.

येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भागवत म्हणाले, अयोध्येतील रामजन्मभूमीवर राम मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी भारतीयांची इच्छा आहे. संघाचाही त्यास पाठिंबा आहे. अयोध्येत राम मंदिर होते हे सिद्ध झाले आहे. राष्ट्रहिताच्या या मुद्द्यावरून स्वार्थ साधण्यासाठी जातीय राजकारण करणारे काही कट्टरवादी अडथळे निर्माण करत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतही काही व्यक्तींकडून नव्या शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

विनाकारण समाजाच्या संयमाची परीक्षा घेणे देशहिताचे नाही. राम मंदिराची उभारणी ‘आत्मगौरवा’च्या दृष्टीने आवश्‍यक आहे. मंदिर झाल्यास देशात सद्‌भावनेचे तसेच एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com