पुन्हा घुमायला लागला 'मै समय हुँ...'हा आवाज

harish bhimani
harish bhimani

नागपूर  : 'महाभारत' ही पुत्रमोहाची कथा आहे. त्यात सांकेतिक स्वरूपात समाजमन दर्शविण्यात आले आहे. सत्य, नीती, राष्ट्रधर्माच्या रक्षणार्थ झालेले युद्ध महाभारतात दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र आणि देशबांधवांच्या रक्षणार्थ प्रत्येकाने पुढे येण्याची  गरज आहे. हे युद्ध घरूनच लढता येऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने या युद्धात आपले योगदान घरी राहूनच देणे अपेक्षित आहे.

आजही महाभारत तेवढेच प्रासंगिक असल्याची भावना 'मै समय हु' या आवाजाने  घराघरात पोहोचलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) चे माजी विद्यार्थी प्रसिद्ध व्हाइसवोर आर्टिस्ट, लेखक, दिग्दर्शक हरीश भिमानी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

डीडी भारती वाहिनीवर शनिवारपासून 'महाभारत' हे महाकाव्य दाखविण्यास सुरुवात झाली. बावीस वर्षांपूर्वी म्हणजे 1988  साली या महाकाव्याचे मालिकेमध्ये रूपांतर करून प्रक्षेपणास सुरुवात झाली. 'रामायणा' प्रमाणेच 'महाभारत' या महाकाव्याने यशाचे शिखर गाठले. त्यावेळी 'मै समय हु' म्हणत हरीश भिमानी यांनी महाभारतातील प्रत्येक प्रसंगाचे यथोचित वर्णन केले. बघता बघता या आवाजाने देशवासियांना वेड लावले. 'मै समय हु' हे कित्येक वर्षे लोकांच्या मनात गुंजत राहिले. आज पुन्हा 'महाभारत' सुरू झाल्याने पुन्हा एकदा हा आवाज देशभरात घुमतो आहे.

महाभारत आजही तेवढेच प्रासंगिक  
महाभारत आजही तेवढेच लोकप्रिय आहे. याचे कारण ते समाजाशी सुसंगत आहे. महाकाव्याबद्दल एका वाक्यात सांगितल्यास ते पितामोह ते पुत्रमोहाची कथा आहे . एकीकडे पित्याच्या वचनासाठी पितामह भीष्माचार्य यांनी असत्याची बाजू घेतली तर दुसरीकडे धृतराष्ट्रने पुत्रप्रेमापोटी वंशाचा नाश केला. आज विशेषतः राजकारणात असेच चित्र दिसते. त्यामुळेच महाभारत आजही तेवढेच प्रासंगिक आहे.
- हरीश भिमानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com