मित्राचे लग्न आटोपले, नंतर परतीच्या मार्गावर घडले असे... 

file photo
file photo

आर्णी (जि. यवतमाळ) : मित्राचे लग्न आटोपून घराकडे परत जाणाऱ्या तीन तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. 10) दुपारी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी (ता. आर्णी) गावाजवळ झाला. 

कारचालक ठार 
प्रेम उत्तम निरंजने (वय 32) असे अपघातात ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे. महागाव तालुक्‍यातील अंबोडा येथे मित्राच्या लग्नासाठी चंद्रपूर येथील बाबूपेटमध्ये वास्तव्यास असलेले प्रेम उत्तम निरंजने (वय 32), डॉ. संजय विठ्ठल जांडेकर (वय 32) व विनय पंजाब मोरे (वय 30) हे तिघे आज रविवारी (ता.10) सकाळी आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एम.एच. 34 ए.ए. 1445) आले होते. लग्न लावून घरी परत जात असताना सुकळी गावाजवळ भरधाव जात असता समोरून येणारे अचानक वाहन आल्याने कारवरील नियंत्रण हुकले व कार रोडच्या कडेवरून घसरून उलटली. 

जखमी ग्रामीण रुग्णालयात 
या गंभीर अपघातात कारचालक प्रेम उत्तम निरंजने हे जागीच ठार झाले व इतर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग पोलिसांनी 102 या रुग्णवाहिकेने आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या महामार्गाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावर रहदारी सुरू आहे. त्यातच वाहने भरधाव चालत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com