मासेमारांचे जगणे कठीण झाले 

मासेमारांचे जगणे कठीण झाले 

नागपूर - केंद्र सरकार व राज्य सरकार चुकीची धोरणे तयार करत आहेत. विदर्भातील सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. मत्स्य व्यवसायावर संकट कोसळले आहे. शेतकरी हवालदिल झाला. मासेमारीत उत्पन्नाचा स्त्रोत सहा टक्‍क्‍यांनी वाढल्याचे कारण पुढे करीत सरकारने साडेआठशे पटीने तलावांची लीज वाढवली. राज्यातील २५ लाख पारंपरिक मासेमारांचे जगणे कठीण झाले. अशावेळी खासदार नाना पटोले यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे अश्रू या विषयावर भाष्य केले. पटोले यांनी सरकारवर केलेली टीका योग्य असून त्यांच्या पाठीशी सारा मासेमार समाज उभा आहे, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी स्पष्ट केली आहे. पटोलेंना पाठिंबा देण्यासाठी विदर्भात सभांचे आयोजन करण्यात येणार असून मासेमारी व्यवसाय धोक्‍यात आला आहे, याबद्दल जनजागरण करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीनवेळा भेटूनही मासेमारी करणाऱ्या समाजाचे प्रश्‍न सुटले नाहीत. ‘आक्षेप नोंदवण्या’च्या मासेमारांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. शेतीप्रमाणेच ‘मत्स्य’ हादेखील पारंपरिक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. परंतु मत्स्य व्यवसायात हातावर पोट असणाऱ्यांचे काय? असा सवाल पाटील  यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com