Ajit Pawar Counters Rahul Gandhi : निवडणुका जिंकल्या की ईव्हीएम किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ नसतो, पण हरलो की कांगावा सुरू होतो, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत आम्हाला कमी जागा मिळाल्या, तरी आम्ही ईव्हीएम हॅकिंग किंवा मतचोरीचे आरोप केले नाहीत.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही, असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केला.