Akola News: ग्रामसेवकांची ढिसाळ यंत्रणा ठरतेय विकासाला अडसर, ६६ गावांचा कारभार ३६ ग्रामसेवकांवर; ग्रामसभाही होईनात

तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी केवळ ३६ ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे. ४९ ग्रामसेवकांची पदे मंजूर असूनही अनेक वर्षापासून केवळ ३६ ग्रामसेवकच कार्यरत असून, १३ पदे रिक्त आहेत.
Akola News: ग्रामसेवकांची ढिसाळ यंत्रणा ठरतेय विकासाला अडसर, ६६ गावांचा कारभार ३६ ग्रामसेवकांवर; ग्रामसभाही होईनात

Akola Gramasevak News: तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी केवळ ३६ ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे. ४९ ग्रामसेवकांची पदे मंजूर असूनही अनेक वर्षापासून केवळ ३६ ग्रामसेवकच कार्यरत असून, १३ पदे रिक्त आहेत.

ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात एक विस्तार अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत, असे असताना मुख्यालयाचे वावडे, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे.

सरासरी दोन ते तीन गावचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असताना ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. जिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात महिना-महिना येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत.

काही ग्रामसेवक महाशय केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर आहेत.

या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. वारंवार दांडी मारणाऱ्या व कायम गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांना गावातील सरपंच यंत्रणा व राजकीय पाठबळ मिळत असल्याने ग्रामसेवक कमालीचे सुस्तावले आहेत. गैरहजर ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे.

अनेक गावात ग्रामसभा होत नाहीत
तालुक्यातील दुर्गम व पंचायत समितीपासून दूर असलेल्या अनेक खेडे व ग्रामीण भागात ग्रामसभा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात ग्रामसभा होत नसून, ग्रामसभेच्या आठ दिवस आधी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात, किंवा खोट्या स्वाक्षऱ्या किवा अंगठे घेतात. सरपंच, ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही. याची चौकशी वरिष्ठांनी करावी अशी मागणी होत आहे.

वर्षातून सहा सभा घेणे बंधनकारक
वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक असून, त्यापेक्षा अधिक ग्रामसभाही घेतल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात ग्रामस्थांना याची पुसटशी कल्पनाही दिली जात नाही. ता. २६ जानेवारी, ता. १ मे, ता. १५ ऑगस्ट, ता. २ ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक असूनही त्या घेतल्या जात नाहीत.

बाळापूर पंचायत समितीमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, अनेकदा मागणी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिक्त पदे असल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. मोठ्या गावांना ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र, ग्रामसेवकांनाच चार ते पाच गावांचा कारभार पहावा लागतो.
- शारदा सोनटक्के, सभापती, बाळापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com