नागपूर : दोन जिवांचे मिलन होताना पुरेसा संवाद न होऊ शकल्यास त्याचे परिणाम कसे भोगावे लागू शकतात याचा प्रत्यय लॉकडाउनमध्ये जुळलेल्या लग्नांमधून (marriage in lockdown) येतो आहे. या काळात विवाह बंधनात अडकलेल्या काही जोडप्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज (family court nagpur) केल्याची माहिती आहे. (couple those married in lockdown filed for divorce in the family court nagpur)
शासनाने लग्न सोहळ्यावर निर्बंध लादल्याने काही कुटुंबांना आयोजन करताना अडचणींचा सामना करावा लागला. तर, कमी खर्चात आणि थोडक्यात लग्नसोहळा आटोपला जाऊ शकतो या बाबीचा विचार करून काहींनी घाई-घाईत लग्नसोहळे उरकले. मात्र, हीच घाई जोडप्यांच्या संसारात व्हिलन बनून उभी ठाकली आहे. लग्न ठरण्याच्या प्रक्रियेत कुटुंबीयांची ओळख, चालीरीती, आवश्यक चौकशी अशा काही बाबींचा समावेश होतो. लॉकडाउन काळात लग्न उरकलेल्या अशा काही जोडप्यांना संवाद साधायला संधी आणि पुरेसा वेळ न मिळाल्याने ही प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेली आहेत. तसेच, सतत घरी राहून स्वभावामध्ये झालेले बदल, होणारी चिडचिड, आर्थिक समस्या यामुळे देखील प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत.
काय करायला हवे?
भविष्याचा विचार करुन संवाद साधावा
जीवनातील प्रत्येक बाजूचा विचार व्हायला हवा
महिला भावनिक असल्याने त्यांना कामात प्रोत्साहन द्यावे
संवादामध्ये समतोलता असावी
आपल्या जोडीदाराच्या मानसिकतेचा विचार करावा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.