नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३१ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाबाहेरील व्यक्तीस प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. या प्रकाराने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळणे जवळपास अशक्य होणार आहे. पदवी प्रवेशास सुरुवात झाली असताना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यापीठाने यावर्षीपासून पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ८८ हजारांवर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. यापैकी ६६ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे. गुरुवारपासून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यास सुरुवात झाली. २४ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिल्या जाणार आहे.
२५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. नागपूर विद्यापीठाप्रमाणेच इतर विद्यापीठातही प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन आणि इलिजिबिलीटी प्रमाणपत्राची गरज पडते. हे प्रमाणपत्र विद्यापीठातून मिळत असते. आता विद्यापीठ बंद ठेवल्यास विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी त्याची गरज पडत नसली तरी, इतर वर्षातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
कुलगुरूंनी काढलेल्या आदेशामुळे विद्यापीठात आता विद्यार्थ्यांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक असून, याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी सिनेट सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
असे आहे वेळापत्रक
विद्यापीठामधील शाखानिहाय जागा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.