Mobile Use : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांत नैराश्य

ग्रामीण भागातही परिणाम;डोळ्यांचे विकार लागले वाढीस
Mobile Phone Use
Mobile Phone Useesakal

- ललित कनोजे

शितलवाडी : मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागते. त्यातून तणाव निर्माण होऊन नैराश्य येते. अभ्यासावर परिणाम होऊन भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वक आणि योग कारणासाठी करावा, असा सल्ला न शिक्षण तज्ज्ञांकडून दिला जात आहे. रामटेक तालुक्यातही असे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

शालेय परिसरातील मनमोकळ्या वातावरणातील मित्रांच्या गराड्यातील असलेली शाळा बदलून, या मुलांची असलेली शाळा चार भिंतीमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या मोबाईलवरती सुरुवात झाली. मोबाईलमध्येही ती चांगली पारंगत झाली.

परंतु आता त्या मोबाईल वापराचे गंभीर असे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मुलांना पुस्तक वाचताना, पुस्तकाच्या ओळींवर बोट ठेवताना पुढील पान उलगडण्यासाठी मुले जेव्हा हातात घेतात. त्या वेळेला मोबाईलसारखी बटणे दाबण्याचा प्रयत्न पुस्तकावर करताना दिसतात. पुस्तकाची पाने उलटावी लागतात.

मोबाईलचा वापर ते करतात आणि नेक्स्ट बटन दाबून पुढील पान मोबाईलवर बदलते तसे पुस्तकावर का येत नाही, अशा पद्धतीच्या प्रश्न मुलांना पडतो आहे. त्याचबरोबर, डोळ्यांचे आजार गंभीर होऊ लागलेले आहेत.

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शालेय परिसरामध्ये शाळेच्या वातावरणामध्ये शिक्षण घेण्याचा आनंद मिळावा, अशी अपेक्षा आता पालकवर्गाकडूनच केली जाऊ लागली आहे. मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत मारक ठरत आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत आहे.

यातून शिक्षणाच्या हेतूवरच आघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अलीकडे तंत्रज्ञानाच्या साथीने मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम सुरू आहे. खरे तर डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. मात्र, याचा थेट विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.

मैदानी खेळांचा विसर

विद्यार्थ्यांसाठी शारीरिक हालचाल आणि मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक वाढ ही खेळाच्या निमित्ताने होत असते. परंतु मोबाईल वापरत असल्याने विद्यार्थी आता फक्त ऑनलाइन खेळ खेळू लागलेत. त्यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ वाया जात आहे. ऑनलाइन खेळ, सोशल मीडिया आणि वेबसीरीज अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे विद्यार्थी हे आततायी बनू लागलेत.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे अत्यंत सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थीदेखील मोठ्या लोकांप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. स्वतःची ऑनलाइन प्रोफाइल त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. स्वकेंद्री व एका आभासी दुनियेत त्यांचा वावर वाढत आहेत. त्यांचे लक्ष आता फक्त मोबाईलमध्येच खिळून राहत आहे. ही धोक्याची बाब असून पालकांनी सजग राहण्याची गरज आहे.

- डॉ.गिरीश सपाटे, मराठी विभाग प्रमुख, विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी ( बिजेवाडा) ता. रामटेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com