जलालखेडा (जि. नागपूर) : अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नरखेड तालुक्यातील मोसंबी व संत्राच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. संत्रा व मोसंबी गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने उपाययोजना सुचविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नरखेड तालुका हा संत्रा व मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. कृषी विभागाच्या व संशोधकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नाही. नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले असतानाही संशोधक अजूनही कुंभाकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
रोग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र, तालुक्यात तसे होताना दिसत नाही. दिवसागणिक नवीन समस्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या संत्रा व मोसंबी उत्पादकांवर पुन्हा नवीन संकट कोसळले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. शासनाने या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असताना फळ गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची झाडे पिवळी पडत आहे व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील फळे पिवळे पडून गळत आहे. त्यामुळे या रोगावर योग्य उपाय योजना कशी करावी यासाठी फळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.