

नागपूर : ‘‘जगातील अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थितीमुळे शेजारील श्रीलंका, पाकिस्तानसारख्या राष्ट्रांमध्ये इंधन, गॅससाठी रांगा लागल्या असताना भारताने आपल्या सामान्य जनतेच्या जीवनावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी केवळ देशाला बदनाम करण्याचे आणि देशात अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहेत,’’ अशा जळजळीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला.