नागपूर : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेला जादा नुकसान भरपाई मिळाल्याने वृद्ध आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. मोटार अपघात दावा प्राधिकरणाने सुनेला ४५ लाख ९७ हजार रुपये, तर पालकांना सात लाख ५० हजार रुपये रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर या वृद्ध पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने विमा कंपनीला व सुनेला नोटीस बजावली असून सुनेला खात्यातून पैसे काढण्यासही मनाई केली आहे.
न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, सुरेश (वय ६३) आणि त्यांच्या पत्नी वासंती (वय ५७, दोघांची नावे बदललेली) यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, त्यांचा मुलगा नरेश याचा १७ जून २०१७ रोजी नवी दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. पुढे कुटुंबीयांनी मोटार अपघात दावा प्राधिकरण, नागपूर येथे याचिका दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली होती.
नरेशचे पालक, पत्नी शोभा (वय ३३) आणि भाऊ विरेश (वय २३, सर्व नाव बदललेले) या तिघांनी हा दावा केला होता. नरेशचा लहान भाऊ विरेश हा कमाविता आहे. त्यामुळे, त्याला नुकसान भरपाई देण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
उच्च न्यायालयात आज सुनावणी
प्राधिकरणाने नरेशच्या पत्नीला ४५ लाख ९७ हजार रुपये आणि आई वडिलांना प्रत्येकी सात लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. आई वडिलांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. राजू कडू यांनी बाजू मांडली. यावर उद्या (ता. २९) सुनावणी निश्चित केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.