Nagpur : चार तासांत दुकाने भुईसपाट : रेल्वे प्रशासनाविरोधात असंतोष,दुकानदारांच्या डोळ्यातून अश्रू

पन्नास ते साठ वर्षांपासून येथे दुकाने थाटलेली होती. इतक्या वर्षांत कोणालाही कधीही हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस आली नाही. आणि आज सकाळी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे पोलिसांनी चार बुलडोझरद्वारे येथे व्यवसाय करणाऱ्यांची सर्वच दुकाने भुईसपाट केली.
nagpur
nagpursakal

नागपूर- अजनी रेल्वे पुलालगत मागील साठ वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर रेल्वे प्रशासनाने बुधवारी (ता.८) सकाळच्या प्रहरी बुलडोझर चालवून सर्व अतिक्रमण काढले. अवघ्या चार तासांमध्ये हे अतिक्रमण रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत काढण्यात आले. त्यामुळे कालपर्यंत येथे उभी असलेली दुकाने आज भुईसपाट झाली. ही जागा अतिक्रमित असल्याचे अनेकांना माहीत नसल्याने नेमके काय झाले याची चर्चा रंगली होती.

पन्नास ते साठ वर्षांपासून येथे दुकाने थाटलेली होती. इतक्या वर्षांत कोणालाही कधीही हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस आली नाही. आणि आज सकाळी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे पोलिसांनी चार बुलडोझरद्वारे येथे व्यवसाय करणाऱ्यांची सर्वच दुकाने भुईसपाट केली.

त्यामुळे येथील सर्वच दुकानदारांच्या मनात रेल्वे प्रशासनाविरोधात असंतोष खदखदत होता, मात्र यानंतरही कोणीही विरोध करण्यासाठी पुढे आली नाही. सकाळी नऊ च्या सुमारास अतिक्रमण काढण्याचे काम सुरु झाले. एक वाजेपर्यंत सर्व दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. दुकानांमुळे येथे २४ तास वर्दळ राहायची. पहाटे पासूनच ही दुकाने सुरू व्‍हायची. मात्र हे अतिक्रमण काढल्यामुळे या रस्त्यावरून रात्री जाणे जोखमीचे ठरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

  • मामू टी स्टॉल इतिहासजमा

पुलाजवळ असलेल्या मामू टी स्टॉलवर नागपुरातील विविध भागातून लोक चहा घेण्यासाठी येत असत. पण आज मामू टी स्टॉल इतिहासजमा झाला. सोबतच मनीष बेकरी आणि माजी नगरसेवकाचे जे. के सायकल स्टोअर्सचे अतिक्रमणही हटले.

  • पर्यायी जागा देण्याची मागणी

ज्या दुकानाच्या भरवशावर आम्ही कुटुंबाचा सांभाळ केला. ती दुकाने उद्‍ध्वस्त होत असताना दुकानदारांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मात्र कोणीही विरोध केला नाही. पन्नास ते साठ वर्षांपासून आमची दुसरी पिढी येथे दुकानदारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्याच्या उत्तरार्धात आम्हाला रेल्वे प्रशासनाने विस्थापित केले.

दुकान तुटल्यामुळे पोट कसे भरायचे हा सवाल दुकानदारांनी उपस्थित केला. आमच्या तोंडातील घास रेल्वे प्रशासनाने हिसकावला अशी व्यथा येथील दुकानदारांनी बोलून दाखवली. पुलाच्या विस्तारीकरणाचे काम होत असल्यास रस्त्याच्या कडेला आम्हाला दुकाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com