Shivrajyabhishek : दक्षिणेत पाच सुलतानशाह्या एका क्षणात लुप्त झाल्या, शिवराज्याभिषेक व्हावा, ही ‘श्रींची इच्छा’

ज्यांच्या विजयाची परंपरा अतुलनीय असल्याचे आपला इतिहास सांगतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती सर्वत्र होती आणि त्यावर मात करत अनेक जय-पराजय मिळवत संकटांना समोर जात विजय प्राप्त केला.
shivrajyabhishek sohala at raigad
shivrajyabhishek sohala at raigadsakal

अजय चव्हाण

Shivrajyabhishek Sohala - शालिवाहन शकाच्या १५९६ व्या वर्षी आनंद संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभमुहूर्तावर शनिवारी, ६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी राजांकडे व्यक्तीच्या गुणांची, कौशल्यांची अचूक पारख करण्याची असामान्य दृष्टी होती. त्यातून त्यांनी अचूक माणसे हेरली आणि स्वराज्य उभे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विशिष्ट आचार-विचाराने स्वराज्याची स्थापना करत समस्त भूतलावर गेल्या साडेतीन शतकांपासून आपल्या विचारांचा प्रभाव कायम ठेवला. भारतात अनेक राजे होऊन गेले,

shivrajyabhishek sohala at raigad
Mumbai : ८८ गृहप्रकल्पाची नोंदणी करण्यात येणार रद्द ; महारेराकडून यादी संकेतस्थळावर जाहीर

ज्यांच्या विजयाची परंपरा अतुलनीय असल्याचे आपला इतिहास सांगतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती सर्वत्र होती आणि त्यावर मात करत अनेक जय-पराजय मिळवत संकटांना समोर जात विजय प्राप्त केला. नुसता विजय प्राप्त करून शांत बसलो नाही, तर ही घडी कायम कशी ठेवता येईल, याचा पुरेपूर विचार केला गेला.

म्हणून एखादी गोष्ट प्राप्त केली आणि निश्चिंत झालो, असं होत नसते तर मिळवलेलं राज्य कसं सांभाळता येईल, यासाठी कसा प्रयत्न करता येईल, याचाही विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून प्रत्येक काळात शिवाजी महाराजांचे स्मरण होणे, म्हणजेच सुदृढ स्वराज्य निर्माण करणे होय.

महाराज फक्त आपल्या धुरंदर किंवा विचारवंतांच्या मध्येच राहत नव्हते, तर ते अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचे. बरेचदा वेशांतर करून, आपल्या राज्यातील परिस्थितीचा आढावा स्वतः घेत आणि त्यातून येणाऱ्या अनुभवाची तत्काळ कार्यवाही स्वराज्याला बळकट करण्याचे कार्य छत्रपतींनी केले.

शिवाजी महाराजांनी मिळवलेला विजय म्हणजे केवळ सत्ता प्राप्त करणे किंवा लूटपाट करणे एवढा नव्हता, तर धर्म विद्ध्वंसक प्रक्रिया थांबवणे, सहिष्णुता, शांती, अहिंसा या तत्त्वज्ञानाला अबाधित ठेवण्याचे काम आणि यासाठी लढाई करून विजयप्राप्त करणे. या विजयाचा हा राज्याभिषेक होता.

shivrajyabhishek sohala at raigad
Mumbai : मुंबईकरांना राखीव साठ्यातील दीड दशलक्ष लिटर पाणी जुलैअखेर पुरविणार; सरकारचा निर्णय

गेल्या पाचशे वर्षात समाजात चाललेल्या विद्ध्वंसक पद्धतीचा नायनाट करणे म्हणजे राज्याभिषेक होता. शिवाजी महाराजांनी राजा व्हावे ही देशभरातील संत, महात्मे, थोर पुरुष, विचारवंतांची इच्छा होती. शिवाजीसारखा राजा हिंदू धर्माचे रक्षण करण्याकरिता सिंहासनावर रूढ व्हावा म्हणून हा राज्याभिषेक महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराजांनी देश, धर्म यांचा फक्त विचार केला. अनेक वीरांना विचारलं की, तुम्ही देशासाठी काय कराल? तर त्यावर त्यांचे उत्तर असेल की मी देशासाठी प्राणअर्पण करणार, मात्र शिवाजी महाराजांनी म्हणतात की, मी देशांसाठी लढेल आणि शत्रूंचा नायनाट करून विजय संपादन करेल. काय परिस्थिती होती? उत्तरेकडे बादशहाचे राज्य होते,

दक्षिणेत पाच सुलतान, विजय नगरसारखे बलाढ्य साम्राज्य एका क्षणात लुप्त झाले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अष्टप्रधान मंडळाच्या आधारे, एक उत्तम सुराज्य निर्माण त्यांनी केले. संपूर्ण परिस्थितीचे उत्तम निरीक्षण करत उत्तम राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.

shivrajyabhishek sohala at raigad
Mumbai : ८८ गृहप्रकल्पाची नोंदणी करण्यात येणार रद्द ; महारेराकडून यादी संकेतस्थळावर जाहीर

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देशाला अखंड करण्याचे स्वप्न उराशी बाळगू. आपापसातील भेदभाव दूर सारून देशासाठी एकत्र यावे व संपूर्ण जगात भारताला वैभवशाली बनवण्यासाठी प्रयत्न करावे. हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल. यशवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत जाणता राजा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

अध्यापक, सेवासदन हायस्कूल, नागपूर मो. ९४०३२४२४७३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com