

Over 3,000 Teachers Face Service Threat Due to TET Norms in Maharashtra
Sakal
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षक संवर्गातील पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांपैकी मोठ्या संख्येने शिक्षकांकडे अद्याप टीईटी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. चार हजार शिक्षकांपैकी केवळ ७०० शिक्षक टीईटीधारक असून उर्वरित ३ हजार ३०० शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.