

Vidarbha Chase on Track After UP’s 200-Run Target
Sakal
नागपूर: यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या विदर्भाला उत्तर प्रदेशविरुद्ध आणखी ११० धावांची गरज असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहे. त्यामुळे या लढतीत दोन्ही संघाला समान संधी आहे. रविवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. आता विदर्भाची मदार नाबाद अर्धशतक करणारा अमन मोखाडे आणि दानिश मालेवार यांच्यावर आहे.