
भंडारा : वाढते शहरीकरण चांगले जीवनमान देत असले तरी आपल्या आजूबाजूचा निसर्ग मात्र, काळवंडत आहे. जलस्त्रोत दूषित होत असून मानवी घाण आणि औद्योगिक कचरा व घातक रासायनिक पाणी थेट नदी, नाले आणि तलावात प्रक्रिया न करता सोडले जात आहे. याचा परिणाम मानवाबरोबरच जैवविविधतेवरही झाल्याचे दिसून येत आहे.