नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम व संततधार पावसाने दिलासा दिल्यानंतर गुरुवारी वरुणराजाने अनपेक्षित ब्रेक घेतला.
ढगाळ वातावरणासोबतच ऊन तापल्याने नागपूरकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. गुरुवारी ब्रेक घेतल्यानंतर आता शुक्रवारनंतर तरी वरुणराजाची कृपादृष्टी होईल का याकडे नागपुरकरांचं लक्ष लागून आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात चार दिवस ऑरेंज व यलो अलर्ट दिला होता. मात्र हवामान विभागाचा इशारा गुरुवारी चक्क फोल ठरला. दिवसभर पावसाचा एक थेंबही पडला नाही. सकाळी व दुपारी आकाशात ढगांची दाटी झाली होती.
मात्र पाऊस न पडताच ढग गायब झाले. शिवाय सूर्यनारायणही अधूनमधून डोकावत होता.
आर्द्रता वाढल्याने दिवसभर गरमी, अस्वस्थता व चिडचिड जाणवली. त्यामुळे पुन्हा घराघरातील कुलर व पंखे फुल स्पीडमध्ये फिरले.
शुक्रवारी नागपूर व भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जोरदार पाऊस अपेक्षित आहे. शनिवारपासूनही विदर्भात दोन-तीन दिवस यलो अलर्ट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.