नागपूर ः देशात सध्या उद्योगांमध्ये यशस्वी महिला उद्योजिकांची संख्या ८० लाख असून येत्या पाच वर्षात महिला उद्योजिकांची संख्या दोन कोटींपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून मदत करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्त्री उद्यमी फाऊंडेशनच्यावतीने महिला उद्योजिका मेळाव्यात गडकरी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाले, की देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आज कमी आहे. ग्रामीण आणि मागास भागाचा औद्योगिक विकास झाला तर जीडीपी वाढेल.
आज ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था फक्त ८० हजार कोटींची आहे. ती पाच लाख कोटींपर्यंत नेण्याची गरज असल्यामुळे महिला उद्योजिकांनी आता ग्रामीण भागात उद्योग सुरू करून त्या भागाचा विकास आणि सोबतच महिला सशक्तीकरण करणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात तेथील कच्चा मालावर आधारित उद्योग सुरू होऊ शकतात. आमच्याकडे विविध कला अवगत असलेले कलाकार आहेत, पण त्यांच्या कलेला वाव मिळत नाही. सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग विभागामार्फत शासन या कलाकारांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत,असे गडकरी यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.