यवतमाळ : "देशात कॉंग्रेसच्या काळात 70 हजार कोटींची विमान खरेदी करण्यात आली. हे विमान घेण्याऐवजी कॉंग्रेस सरकारने सिंचनावर पैसे खर्च केले असते, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या', असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ आकोलाबाजार येथे गुरुवारी (ता.17) आयोजित सभेत केला.
गडकरी म्हणाले की, निवडून आलेल्या सरकारसाठी निवडणूक ही एकप्रकारे परीक्षाच असते. यात सरकारने केलेल्या कामांवर जनता सरकारला पास किंवा नापास करीत असते. मागील निवडणुकीत जनतेने विकासाची कास धरून महायुतीला सत्तेत आणले. यावेळीही जनता कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.