अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत बुधवारी (ता.23) पहिल्या दिवशी 19 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले, तर सहा तालुक्यांतून एकही नामांकन दाखल झाले नाही.
जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. बुधवारपासून नामांकनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 19 अर्ज दाखल झाले. अमरावती तालुक्यात 3, तिवसा 4, दर्यापूर 1, मोर्शी 1, अंजनगावसुर्जी 2, अचलपूर 2, चांदूरबाजार 5, असे नामांकन दाखल झालेत, तर वरुड, धारणी, चिखलदरा, नांदगावखंडेश्वर, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे या तालुक्यांमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. 30 डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे.
दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने सरपंचपदाचा उमेदवार कोण? याबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर पॅनेलची स्थापना सुरू आहे. त्यात सर्वसमावेशक उमेदवारांचा शोध सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा - यशोगाथा : शिकता शिकता फुलवली शेती, सेंद्रिय...
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या -
अमरावती 46, भातकुली 36, तिवसा 29, दर्यापूर 50, मोर्शी 39, वरुड 41, अंजनगावसुर्जी 34, अचलपूर 44, धारणी 35, चिखलदरा 23, नांदगावखंडेश्वर 51, चांदूररेल्वे 29, चांदूरबाजार 41, धामणगावरेल्वे 51.
सोमवारपासून येणार गती -
बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. परंतु, शुक्रवार, शनिवार तसेच रविवारी सार्वजनिक सुट्टी येत आहेत. निवडणूक कार्यक्रमात सार्वजनिक सुट्टी वगळून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असा उल्लेख असल्याने सोमवारपासून खऱ्या अर्थाने या प्रक्रियेला वेग येईल, असे मानले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.