कीटकनाशकांमुळे वर्षाला साडेतीन लाख बळी

File photo
File photo

यवतमाळ : गेल्या काही वर्षांत पिकांवर कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंकेसह आशिया खंडात कीटकनाशकांच्या वापरामुळे वर्षाला तीन लाख 70 हजार बळी जातात, अशी माहिती सेंटर फॉर पेस्टिसाइड सुसाइड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. मायकल एडिलस्टन यांनी आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी तणावात जगत आहेत. कीटकनाशक प्राशन करणे वा त्याच्या फवारणीमुळे विदर्भात अनेक शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले. कीटकनाशक सहज उपलब्ध होणे ही गंभीर बाब आहे. आतापर्यंत 15 हजार शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मात्र, यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश नसल्याने ही आकडेवारी पुढे येत नाही. अन्यथा हा आकडा 80 हजारांच्या घरात पोहोचला असता, अशी शक्‍यता डॉ. एडिलस्टन यांनी व्यक्त केली.
रुग्णालयात कशापद्घतीने उपचार करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर कमी करावा व शासनाने धोरणात बदल करावा, हे उपाय करण्याची गरज आहे. कीटकनाशकांच्या वापरात वाढ झाल्यानेच आत्महत्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने काही कीटकनाशकांवर निर्बंध घालणेदेखील आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी सुरक्षित कीटकनाशकांचाच वापर करावा. अनुप वर्मा यांच्या कमिटीने रजिस्टर्ड असलेल्या 291 कीटकनाशक औषध कंपन्यांचा अभ्यास केला. पैकी 18 कंपनीच्या कीटकनाशकांवर बंदी टाकण्याची शिफारस केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यावेळी डॉ. अयांथी करुणारत्ने (श्रीलंका), पॅन इंडियाचे डॉ. नरसिम्हा रेड्डी, किसान कॉंग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार, दिलीप कुमार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com