संधी दिली; पण संकेतस्थळ बंद 

संधी दिली; पण संकेतस्थळ बंद 

नागपूर - आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी पालकांना नव्याने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी गुरुवारपासून (ता. 29) उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ बंद असल्याने पालकांची निराशा झाली. पालकांना 4 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येईल. 

राज्यातील 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. राज्यात 8 एप्रिल रोजी आरटीईची पहिली सोडत काढण्यात आली. त्यानुसार, पहिल्या फेरीत राज्यात 60 हजार 706 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील 44 हजार 983 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला. दरम्यान, सोमवारी (ता. 27) प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून पालकांनी केलेल्या अर्जात दुरुस्तीसाठी संधी देण्याचे पत्र काढण्यात आले. पत्रानुसार ज्या पालकांनी अर्ज "कन्फर्म' केलेले नाही, त्यांना ते "कन्फर्म' करणे, तसेच चुकलेले गुगल लोकेशन दुरुस्त करता येणे, पडताळणी समितीने पालकांच्या तक्रारीची खात्री करून तांत्रिक चुका दुरुस्त करणे आदींचा समावेश करण्यात येणार होता. बुधवारपासून (ता. 29) आरटीईच्या अर्जात दुरुस्ती करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, बुधवारी संकेतस्थळच बंद असल्याने पालकांना कुठल्याच प्रकारची दुरुस्ती करता आली नाही. विशेष म्हणजे याबद्दल आरटीई ऍक्‍शन समितीचे शाहिद शरीफ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती सादर केली. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com