आशांच्या बहिष्काराने रुग्ण शोधमोहीम फसली

file photo
file photo

नागपूर : राज्यभरात टीबी, कुष्ठरुग्णांसह असंसर्गजन्य आजारांचे "रुग्ण' शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आशा व अंगणवाडी सेविकांकडून असहकार सुरू झाल्याने ही मोहीम पहिल्याच दिवशी फसली.
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे निमित्त साधून राज्यात असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधमोहिमेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. 28 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. विशेष रुग्ण शोध अभियान राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु, पहिल्याच दिवशी या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. राज्यभरात कुष्ठरोग आणि टीबीचे रुग्ण शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून मोहीम सुरू आहे. त्यातच मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता या रुग्णांना देखील शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

मोहिमेसाठी आरोग्य सेविकांची मदत घेण्यात येत आहे. मात्र, आरोग्य सेविकांना खेड्यांची माहिती नाही. घरोघरची स्थिती माहीत नाही. यामुळे ही मोहीम आशांशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने रुग्णशोध मोहीम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम नाही, यामुळे योजनाबद्ध कामे त्यांना देऊ नये असा निकाल 2012 मध्ये दिला. यानंतरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर हे काम थोपवले आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात 16 आणि 17 सप्टेंबरला आंदोलन करण्यात येत आहे.
- श्‍याम काळे, राज्य सचिव, आयटक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com