तालुक्याचं नाव समुद्रपूर पण नागरिकांची मात्र पाण्यासाठी वणवण; आठ दिवसांपासून होताहेत हाल 

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613300972455,"A":[{"A?":"I","A":53.999999999999986,"B":775.9187100748236,"D":150.54817013017293,"C":46.25934682181676,"a":{"B":{"A":{"A":"MAEV5-nOqQ8","B":1},"
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613300972455,"A":[{"A?":"I","A":53.999999999999986,"B":775.9187100748236,"D":150.54817013017293,"C":46.25934682181676,"a":{"B":{"A":{"A":"MAEV5-nOqQ8","B":1},"

समुद्रपूर (जि. वर्धा) : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीचा पाणीसाठा उन्हाळ्यापूर्वीच संपुष्टात आल्यामुळे नळ योजना आता पांढरा हत्ती ठरत आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डाला आठ दिवसांआड केवळ अर्धा तासाचा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नगरपंचायतीच्या या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

नगरपंचायतीच्या मालकीच्या लाल विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. तसेच इतरही विहिरींत पाणीसाठा उपलब्ध आहे. सदर विहिरींचे पाणी टॅंकरने जनतेला पुरविल्यास जनतेच्या अडचणी दूर होऊ शकतात. समुद्रपूर नगरपंचायतीची विशेष बाब म्हणजे आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा विहिरीवरील मोटारी जळत असल्याने उघड झाले आहे. त्यामुळे मोटारी का जळतात याचाही शोध घेण्याचे गरजेचे आहे. सर्व सोयी असताना नागरिकांना विनाकारण पाण्यासाठी वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याची ओरड आहे.

प्रशासनाने सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे शिवाय शहरात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी विरोधी गटनेता मधूकर कामडी, माजी नगरसेवक आशीष अंड्रस्कर, सरिता लोहकरे, हर्षा डगवार, राजू ऊमरे यांनी समुद्रपूर येथील नागरिकांच्या वतीने केलेली आहे.

अल्प पर्जन्यमानामुळे उद्‌भवते समस्या

तालुक्‍यात अल्प पर्जनमानामुळे गावागावांत ही समस्या उद्‌भवू शकते. 2019 ला 1096 मी.मी. एवढे पर्जन्यमान झाले होते. तर जून 2020 अखेर पर्यत केवळ 638 मी.मी पाऊस झाला. यामुळे परिसरात जानेवारी फेबुवारी महिन्यापासूनच बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. 458 मी.मी. पाणीसाठा कमी झाल्याने गावागावात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

नळ योजनेच्या विहिरीचा पाणीसाठा कमी झाला आहे. मोटारपंप जळाला आहे. त्याच प्रमाणे एका बोरची मोटार आतमध्ये फाल्यामुळे व ती निघत नसल्यामुळे तोही पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे.
- पवन धुमाळ
प्रशासकीय अधिकारी .
न.प. समुद्रपूर

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com