नागपूर : उत्तर प्रदेशात पाठविण्यात आलेले पाच लाखांचे डाळिंब वाटेतच फुर्रर्र झाले. पोलिसांनी फळविक्रेत्याच्या तक्रारीवरून रोडवेजचा संचालक, वाहनचालक आणि उत्तर प्रदेशातील व्यापारी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रथमेश चौक, नेताजीनगर येथील रहिवासी पन्नालाल शाहू यांचा कळमना मार्केटमध्ये पन्नालाल अँड कंपनी नावाने फळविक्रीचा व्यवसाय आहे. ते नेहमीच उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये असलेल्या रहमतउल्ला फ्रुट कंपनीला फळांचे बॉक्स पॅक करून पाठवीत असतात. 30 डिसेंबर रोजी त्यांनी राजेश जयस्वाल यांच्या प्रकाश रोडवेज लॉरी सप्लायर कंपनीमार्फत 5 लाख 8 हजार 186 रुपये किमतीचे 10 टन डाळिंब पाठविले. एकूण 961 बॉक्समधून हा माल पाठविण्यात आला. मात्र, हा माल संबंधित दुकानात पोहोचलाच नाही.
आरोपींनी संगनमत करीत वाटेतच मालाची विल्हेवाट लावून फसवणूक केली. याप्रकरणी पन्नालाल शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी सप्लायर कंपनीचे राजेश जयस्वाल, उत्तर प्रदेशातील कुतूबपूर संभल येथील रहिवासी मोहम्मद हारून शाहीद हुसेन आणि वाहनचालक अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.