आला वारा गेला वारा, कुठं गेला प्रवासी निवारा?

pravashi nivara.j
pravashi nivara.j

अकोला : ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन-पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात आणि गाव फाट्यावर शासनाच्या वतीने प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु, त्याचा फायदा प्रवाश्‍यांना कमी अन् व्यवसायिकांना जास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.


एसटी बसही वेळेवर येत नाहीत
प्रवासी निवाऱ्यात कोणी छोटी-मोठी दुकाने लावली, कोणी पानटपऱ्या लावल्या. तर, कोणी अवैधरित्या जुगार लावण्याचे काम होती घेतली आहेत. एवढेच नाही तर कोणी गाय-म्हैस किंवा गाढव बांधण्यासाठी गोठा म्हणून त्याचा उपयोग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाश्‍यांना प्रवासी निवारा असल्यावर सुद्धा रोडवर किंवा झाडाच्या सावलीचा साहारा घेऊन एसटी बसची वाट पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवासी निवारा कोणाचा साहारा? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात बोटावर मोजण्या इतक्या बसच्या फेऱ्या असतात. एसटी बसचा प्रवास सुरक्षतेचा आणि फायद्याचा असल्याने वृद्ध, विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिक बसनेच प्रवास करणे योग्य समजतात. परंतु, हीच बस वेळेवर येत नसल्याने, प्रवाश्‍यांना अनेक वेळा तासन-तास ताटकळत बसून बसची वाट पाहावी लागते.


अवैध धंदेही चालतात जोमात
कधी ऊन, पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी, महिला व विद्यार्थिंनींना कुठेही उभे किंवा बसण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने गावोगावी किंवा गावाच्या फाट्यावर ‘प्रवासी’ निवाऱ्याची उत्तम सोय करून ठेवली आहे. परंतु, सोयीचा प्रवासी कमी अन् व्यावसायिकच जास्त फायदा घेताना दिसत आहेत. कोणी बोलणारे नसल्याने त्याचा फायदा घेत काहींनी चक्क निवाऱ्याला गोठ्याचे स्वरुप दिले असून, त्यामध्ये राजेशाहीने जनावरे, गाढव बांधण्याचा पराक्रम करीत आहेत. अकोट रस्त्यावर असलेल्या उगवा फाट्याजवळील प्रवासी निवाऱ्यामध्ये हॉटेल, पानटपऱ्या आणि फ्रुटची दुकाने सजवल्या आहेत. इतकेच नाही तर शहरामधील शिवणी- मूर्तिजापूर महामार्गावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यात अवैध जुगार धंदा चालविण्याचा सपाटा लावला आहे. याकडे संबंधित प्रशासनासह पोलिस विभागाचे देखील दुर्लक्ष झाले आहे. अधिकाऱ्यांच्या दर्लक्षनाचा फटका मात्र, प्रवाश्‍यांना बसत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.


प्रवासी कमी अन् जुगारीच जास्त
मनपाच्या वाढीव हद्दीत आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या शिवणी येथील महामार्गावर बांधण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यामध्ये याच परिसरातील काही नागरिकांनी जुगाराचा अड्डा बनविला आहे. त्यामुळे निवाऱ्यात प्रवासी कमी जुगारीच जास्त दिसत असतात. अशा वेळी अवैधरित्या चालणाऱ्या आणि मुख्य रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा प्रश्‍न प्रवाश्‍यांनसहीत सामान्य नागरिकांना पडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com