खासगी वाहने प्रदूषणाला जबाबदार : फडणवीस

खासगी वाहने प्रदूषणाला जबाबदार : फडणवीस

नागपूर : 'मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत असून, वाहनांची संख्याही वाढत आहे. खासगी वाहने प्रदूषण वाढीसाठी जबाबदार असून, सर्वसमावेशक व पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज आहे. विजेवर धावणाऱ्या वाहनांमुळे देशातील वाहतुकीचा चेहरा बदलणार असून, सरकार यासाठी पुढाकार घेत आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

महामेट्रो, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार विभागातर्फे 'अर्बन मोबिलिटी इंडिया-2018' ही परिषद व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज सर्वत्र उत्तम व रुंद रस्ते होत आहे.

त्याचप्रमाणे कार उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्मार्ट कार तयार करीत आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करणे आवश्‍यक आहे. मुंबईत मेट्रो रेल्वे, सबअर्बन रेल्वे, बस, टॅक्‍सी या सर्व वाहतुकीची एकच एकात्मिक वाहतूक सुविधा तयार करण्यात येत आहे. यासाठी प्रवाशांना एकच तिकीट राहणार असल्याने त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचेल. एकात्मिक वाहतुकीच्या जाळ्यामुळे अनेक समस्या संपुष्टात येतील, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com