दिवसभराच्या पावसाने जनजीवन विस्कळीत

भिवापूर तालुक्‍यात नक्षी नदीच्या पुराने गावकऱ्यांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला.
भिवापूर तालुक्‍यात नक्षी नदीच्या पुराने गावकऱ्यांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला.

भिवापूर(जि.नागपूर) : मंगळवारी (ता. 30) सकाळपासून पावसाने सुरुवात केली. त्यामुळे दैनंदिन कामात व्यत्यय येऊन जनजीवन विस्कळीत झाले. काही जि. प. शाळा तसेच खागी शाळा बंद ठेवण्यात आल्यात. काही नदीपुलावरून तर काही नद्या दुथडी ओसंडून वाहत होत्या. पहाटेपासून वाऱ्यासह पाऊस पडत असल्याले थंडीही वाटत होती. तालुक्‍याच्या ठिकाणी शिक्षणाची सोय आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत व कॉलेजमध्ये जायला तयारी केली. परंतु पावसासमोर त्यांचे काहीच चालले नाही, तर काही विद्यार्थी शाळेत जाऊन गेल्या पावली वापस आले. गावखेड्‌यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या, असे चित्र नजरेस पडले. नक्षी नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नक्षीसह वळध, मांगली (जग), तातोली, नांदीखेडा, गोहल्ली, धामणगाव (विम), हत्तीबोडी, झिलबोडी, रोहना, चिखली इत्यादी गावांचा तालुक्‍याशी संपर्क तुटला होता. तालुक्‍याच्या दुसऱ्या टोकावर असणाऱ्या नांद परिसरातील नदीनाले दुथडी वाहत असल्याने हिंगणघाट मार्गसुध्दा बंद असल्याची माहिती आहे.
अंगावर भिंत पडल्याने युवक जखमी
कुही ः तालुक्‍यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. बुुधवारी सकाळी सातच्या सुमारास देवानंद दादुजी नागदेवे (वय 32, मांढळ) यांच्या अंगावर त्यांच्या घराची भिंत कोसळली. लगेच नातेवाईक व शेजा-यांनी देवानंदला प्राथमिक आरोग्य ैकेंद्रात जखमी अवस्थेत आणले. देवानंदच्या पायाला व डोक्‍याला मार लागला आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
कोलार नदीवरून वाहतूक बंद
खापरखेडा : कामठी मार्गावर बिनाजोड शिवारात असणाऱ्या कोलार नदीच्या ब्रिटिशकालीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या पुलाच्या बाजूने वाहतुकीकरिता तयार करण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक सुरू असताना संततधार पावसामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक सुरू असलेल्या पुलाची सुरवातीची बाजू खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली.

भिंत कोसळून शेळ्यांचा मृत्यू
उमरेड : काही दिवसांपासून तालुक्‍यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर शहरातही मंगळवारी रात्री भिंत कोसळून शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. नितीन नत्थूजी लहाने (वय 30) आणि अशोक चिरकूट दवंडे (वय 65, दोघेही रा. धनगर मोहल्ला, उमरेड) येथील रहिवासी असून मेंढपाळ असल्यामुळे त्यांच्याकडे अंदाजे 100 शेळ्या आहेत. घरी त्या बांधण्याकरिता जागा नसल्यामुळे घराजवळच जुना पडक्‍या अवस्थेतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रांगणात शेळ्या -मेंढ्‌या बांधल्या जातात. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य मेंढपाळसुद्धा तेथे शेळ्या बांधतात.अतिवृष्टीने पडलेल्या भिंतीखाली त्यांच्या अंदाजे पाच शेळ्यांचा दाबून मृत्यू झाला, तर अन्य काही शेळ्या गंभीर जखमी झाल्याचे कळते.या घटनेत सुमारे 40 हजारांचे नुकसान झाल्याचे शेळ्याच्या मालकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com