संग्रामपूर : वान धरणाचे सहा दरवाजे उघडले

वानखेड गावाचा संपर्क तुटला : प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा
rain
rainsakal

संग्रामपूर: दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने रविवार सायंका़ळपासून जोर धरला तर हा पावसाचा जोर सोमवारी दिवस़भर कायम असल्याने संग्रामपूर तालुका जलमय झाला आहे़ शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून, काही खेड्यांचा तालुक्याश्ी संपर्क तुटला असल्याने जनजीवन प्रभावीत झाले आहे.

अशातच मध्यप्रदेश मध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर असल्याने वान नदीवरील हनुमान सागर धरणात १९ जुलै ला ६५ टक्के पाण्याचा साठा झाला आहे़ धरणातील आवक पाहता सोमवार १८ जुलै रोजी या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले असून वान नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वान नदीत धरणातील पाणी सोडण्यात आल्याने वानखेड गावाचा १८ जुलैच्या रात्री पासून संपर्क तुटला आहे. तर १९ जुलै च्या सकाळी सुध्दा या गावात जाणाºया पुलावरून ४ फूटाचे वर पाणी वाहत होते़ सोबतच या नदी पात्रातील रिंग्णवाडी ते उबर्डी पुल समवेत बंधाºयात पाणी अडले आहे़ नवीन तंत्रज्ञानाने या पुलाचे बांधकाम गत वर्षी आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे़ वरून पूल आणि खाली बंधारा अशा प्रकारचे बांधकाम असल्याने वान धरणातून पाणी सोडल्यानंतर या बंधाºयात बरेच लांब पाणी अडविले जाते. यामुळे परिसरातील शेतकºयांना दिलासा मिळणार एवढे निश्चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com