प्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल

File photo
File photo

नागपूर  : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी बचाओ बेटी बढाओ अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेशही राज्यांना दिले. मात्र, राज्यातील शाळांनी सरकारी अध्यादेशाला धुडकावून मुलींसाठी प्रसाधनगृहे तयार करताना दिलेली निकषांना तिलांजली दिली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मुलींना शाळेत आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी सर्वशिक्षा अभियानाद्वारे केंद्राकडून पुरेसा निधीही देण्यात येतो. साधारणत: राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत तो निधी खर्च केला जातो. राज्याने या उपक्रमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करीत या निधीचाही योग्य उपयोग केला असल्याचे दिसून येते. अनेक शाळांमध्ये मुलींसाठी साधे प्रसाधनगृह बांधण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहे बांधण्याच्या दृष्टीने सर्वशिक्षा अभियानाच्या निधीत तरतूद करण्यात आली. राज्यस्तरावर शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी अध्यादेश काढून सूचना देण्यात आल्यात. निकषांमध्ये 120 विद्यार्थ्यांमागे 1 टायलेट आणि दोन युरिनल असणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांमध्ये या निकषानुसार टायलेटची उपलब्धता होत नसल्याचे दिसून येते.
शाळेत मुलांसाठी वेगळी तर मुलींसाठी वेगळी टायलेटची सोय करण्याचेही या अध्यादेशात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे शाळांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मधल्या सुटीत अनेकदा मुलींकडून त्याचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास येते. राज्यात पंधरा हजारांहून अधिक शाळांमध्ये प्रसाधनगृहेच बांधण्यात आली खरी, पण त्याचे निकष पूर्ण करण्यात शाळा कमी पडल्याचे दिसते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहे उपलब्ध नसून अशा शाळांमधील मुलींना आजाराचा सामना करावा लागतो आहे. यामुळे मुलींची गळती होण्याचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी अशा शाळांमध्ये मुलींची संख्या अल्प होत आहे. एकीकडे शिक्षणाचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्राने अभियानास सुरुवात केली असताना, शिक्षण विभागाच्या बोगस कारभाराने अनेक योजना कागदावरच राबविण्यात येत असून; त्याचा मुलींना फटका बसत आहे.
सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशात 120 विद्यार्थ्यांमागे एक युनिट म्हणजे एक टॉयलेट आणि दोन युरिनल असणे गरजेचे आहे. मात्र, नामांकित शाळा वगळल्यास ती सुविधा कुठेच दिसत नाही हे तेवढेच सत्य आहे.
- दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com