सिंदखेड राजा : 55 हजार 677 शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान 

shetkari
shetkari

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसील, कृषी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित झालेल्या जिरायती, बागायती आणि फळपिकांची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत. पंचनाम्यानुसार तालुक्यातील 55 हजार 677 शेतकऱ्यांचे 62 हजार 504.6 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान  झाले आहे.त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपाची पिके पाण्यात गेल्याने बहुतांश शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीची काळजी लागली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात खरिपाचे 63 हजार 821.5 हेक्टर क्षेत्र आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचन सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

अधिकारी बांधावर
अवकाळी पावसाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, कृषी अधिकारी वसंतराव राठोड , गटविकास अधिकारी के. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकारी, मंडळ विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या मदतीने तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले असून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. वरील त्रीसदस्यीय पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यात पीक नुकसान (बाधित) झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 55 हजार 677  एवढी असून त्यांचे बाधित झालेले एकूण क्षेत्र आहे 62 हजार 504.6 हेक्टर झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील कापूस 22 हजार 290 हेक्टर , सोयाबीन 33 हजार 574 हेक्टर, मका 1 हजार 41.5 हेक्टर, ज्वारी 32 हेक्टर , भाजीपाला 1 हजार 665.78 हेक्टर, फळबाग 495.5 हेक्टरवर तालुक्यामध्ये विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना हवी तात्काळ मदत
तहसील, कृषी व पंचायत समितीच्या त्रिसदस्य पाहणी पथकाने तालुक्यात महसूल मंडळातील प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील बाधित झालेले पिकाचे प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे पंचनामे केले व तसा अंतिम अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.
शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्याचे रब्बी पेरणी खोळंबल्या आहेत संकटसमयी शेतकऱ्यांना मदत करणारे लोकप्रतिनिधी मात्र सत्ता स्थापनेतच गुंग आहेत. त्यांच्या सत्तेचा तिढा सुटून कधी एकदा निवाडा होतो आणि आम्हाला आर्थिक मदत कधी मिळते, याकडेच सर्व शेतकन्यांचे सध्या तरी लक्ष लागून आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com