"टिम राहत'चे 25 गावांत मदतकार्य

file photo
file photo

यवतमाळ : आपत्ती व्यवस्थापन कार्यात पुढे असणाऱ्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या "टीम राहत'ने पूरग्रस्त 25 गावांत मदतकार्य केले. विद्यार्थ्यांनी गाळ काढण्यापासून तर रुग्ण तपासणीपर्यंत सर्वच आघाड्यांवर कामे करून सांगली, कोल्हापूर भागांत सेवाकार्याचे जाळे निर्माण केले आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेकांचे संसार उघड्यावर आले. पूर परिस्थितीनंतर उद्‌भवलेल्या स्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील 145 विद्यार्थ्यांची टीम या भागात दाखल झाली. शासन, प्रशासन तसेच सेवाभावी संस्थानच्या सोबत विद्यार्थ्यांनी अनेक भागात काम केले. 25 गावांतील सार्वजनिक इमारती, घरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काम करीत नागरिकांना सहकार्य केले. याशिवाय स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच इतर वैद्यकीय चमूंनासोबत घेऊन गरजूंपर्यंत सुविधा पोहोचविली. आपत्तीमुळे भयग्रस्त झालेल्या मुलांसाठी गंमतशाळा चालविली. अशा विविध आघाड्यांवर सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या चमूने काम केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामामुळे पूरग्रस्त भागात मोठी मदत झाली. केरळ, ओरिसा तसेच गुजरात भुकंपाच्या वेळीही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com