मेळघाटातील प्रवास मृत्यूच्या दाढेत

file photo
file photo

गौलखेडाबाजार (जि. अमरावती) : कुपोषण तसेच बालमृत्युमुळे नेहमीच चर्चेत राहणारा मेळघाट पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो जीवघेण्या दळणवळणाने. मेळघाटातील अनेक पुलांची कामे अर्धवट असून पुलाखालून वाहणाऱ्या नद्यांवरील अर्धवट पुलांवरून जीव मुठीत घेऊन स्थानिक नागरिकांना वाट काढावी लागत आहे. याचा प्रत्यय कोटमी येथील नादुरुस्त पुलावर येत आहे.
चिखलदरा तालुक्‍यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कोटमी गावाचा अर्धवट पूल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कंत्राटदाराने हा पूल अर्धवट बांधून त्याचे बांधकाम थांबविले. विशेष म्हणजे कोटमीनजीकच्या या पुलाच्या माध्यमातून 40 ते 50 गावांचा संपर्क होतो. तो आता पूर्णपणे तुटला आहे. कोटमी गावातील 200 ते 300 शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडे आहे. हा पूल अर्धवट असल्याने पुलावर लाकडी तसेच लोखंडी शिड्या टाकून नागरिक जनावरे तसेच दुचाकी वाहने घेऊन नदी पार करीत आहेत. जीव धोक्‍यात घालून दररोज नागरिक पुलावरून अशी कसरत करीत असून त्यांच्या जिवाला धोका झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. सदर पुलाचे काम पावासाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित असताना अद्याप या पुलाचे काम झालेले नाही. कंत्राटदाराच्या मनमानीमुळे पुलाचे काम अर्धवट राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com