यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

file photo
file photo

आर्णी/वडकी (जि. यवतमाळ) : स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
रजनीश अरुण तिवारी (वय 36, रा. कोसदणी, ता. आर्णी) व राळेगाव तालुक्‍यातील चहांद येथील वयोवृद्ध श्रीहरी नारायण बोरकुटे (वय 70, रा. चहांद, ता. राळेगाव) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
रजनीश तिवारी या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.16) सकाळी 7:30 वाजता राहत्या घरीच विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
सततची नापिकी तथा बॅंकेचे कर्ज, यामुळे ते हताश होते. मृत रजनीशचे काका भास्कर रामनारायण तिवारी यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नोंद घेतली. त्यांच्या मागे दोन मुली, आई, वडील, पत्नी असा आप्तपरिवार आहे.
दुसऱ्या घटनेत श्रीहरी बोरकुटे यांनी पहाटे गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बोरकुटे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांच्यावर सहकारी बॅंकेचे सत्तर हजार रुपये व खासगी बॅंकेचे पाच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com