आत्महत्या : सरकार मारते कर्जमाफीच्या बाता, शेतक-यांचा बंद होईना कर्जाचा खाता

uddhav thackrey
uddhav thackrey

अमरावती : जिल्ह्यात चोवीस तासांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली, तर दुसऱ्यास शेतात विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीच्या गोष्टी करत आहे तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतक-यांवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे.

बाबूराव देवराव आठवले (वय 58, रा. जवळा शहापूर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर रामराव नामदेव भुते (वय 60, रा. कोंडेश्‍वर) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका शेतकऱ्याची आत्महत्या, दुसऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू
जवळा शहापूर येथील घटना बुधवारी (ता. पाच) सकाळी उघडकीस आली. बाबूराव आठवले यांनी त्यांच्या हरभरा असलेल्या शेतात मंगळवारी (ता. चार) सायंकाळी विषप्राशन केले. ते रात्री घरी परत आले नाही. कुटुंबीयांना शोध घेतला असता त्यांचा मृतदेह बुधवारी (ता. पाच) सकाळी शेतात आढळला. आठवले यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चांदूरबाजार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दुसरी घटना कोंडेश्‍वर येथे घडली. रामराव नामदेव भुते हे शेतात ओलित करण्यासाठी गेले असता पाण्याच्या दांडात विजेचा प्रवाह येऊन त्यांना धक्का बसला. काही दिवसांपासून भुते यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. चार) रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बडनेरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com