Vidhan Parishad Election
esakal
अमरावती : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात छाननीदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरीया यांच्या नामांकनावर घेण्यात आलेले आक्षेप ग्राह्य ठरविण्यात आले. या आक्षेपांवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजोरीया यांचे नामांकन बाद करण्यात येत असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे ते या रिंगणातून आता बाहेर झाले असून त्यांनी या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे व स्थगनादेश मिळवणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समिकरण बदलणार आहेत.