

Wardha
esakal
वर्धा: स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजीच्या विचारधारेवर चालणारी आणि वर्धा शहराची सांस्कृतिक व सामाजिक ओळख असलेली 'गोरस भंडार' ही संस्था सध्या संकटात सापडली आहे. अन व औषध प्रशासनाने रविवारी (ता. ३१) अचानक केलेल्या कारवाईनंतर संस्थेला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या एका कारवाईमुळे दूध उत्पादकांसह ग्राहकांसमोर पेच निर्माण झाला आहे.