

Vardha News
esakala
वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ पासून अधिकृतरीत्या दारूबंदी लागू करण्यात आली. जिल्ह्याला लाभलेला अहिंसेचा वारसा जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय आता केवळ कागदावरच उरल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील शहरापासून ते ग्रामीण भागातील गल्लीबाेळापर्यंत अवैध दारूविक्रीने जोर धरला असून, यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.